माणूस कसा जगतो यात त्याची मेहनत, नशीब आणि भाग्याचा मोठा वाटा असतो, पण यात व्यक्तिमत्त्व, वागणूक आणि सवयी यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. स्वभाव-सवयी बरोबर नसतील, तर त्याचा परिणाम आजूबाजूचे लोक आणि स्वतःवर देखील होतो. काही वाईट सवयी नेहमी टाळल्या पाहिजेत. अन्यथा त्यामुळे तुम्ही गरीब आणि उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आज आपण अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊया, ज्यापासून नेहमी दूर राहावे.
नखे खाणे: नखे चावणे हे कमी आत्मविश्वासाचे लक्षण आहे. यासोबतच ही वाईट सवय अनेक आजारांना कारणीभूत ठरते. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, नखे चघळण्याच्या सवयीचे वर्णन एक कंगाल आणि व्यर्थतेला आमंत्रण देणारी सवय असे केले आहे. या सवयीमुळे कुंडलीचे ग्रह वाईट परिणाम देऊ लागतात. त्यामुळे ते नेहमी टाळा.
रात्रभर खरकटी भांडी ठेवणे : रात्री अन्न खाल्ल्यानंतर अशी खरकटी भांडी रात्रभर ठेवल्याने जीवनात अपयश येते. खरकटी भांडी नेहमी रात्रीच स्वच्छ करा. जमत नसेल तर किमान त्यांना स्वयंपाकघरात सोडण्याची चूक तरी करू नका. ही चूक चांगल्या श्रीमंत माणसालाही गरीब बनवते.
पादत्राणे अस्ताव्यस्त ठेवणे : असे लोक जे शूज आणि चप्पल पद्धतशीरपणे ठेवत नाहीत, त्यांना त्यांच्या कामात वारंवार चढ-उतारांना सामोरे जावे लागते. शूज आणि चप्पल कधीही घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवू नका. अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही.
पाय हलवणे: ज्योतिषशास्त्रात बसताना पाय हलवण्याची सवय अत्यंत अशुभ मानली जाते. अशी परिस्थिती ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे लक्षण आहे. तसेच हे कुंडलीतील चंद्राला कमजोर करून तणावाचा शिकार बनवते.
प्राणी आणि पक्ष्यांना अन्न न देणे: प्राणी आणि पक्ष्यांना खायला घालणे आणि वन्य प्राण्यांना अन्न देणे खूप योग्य आहे. यामुळे कुंडलीतील अशुभ ग्रहही शुभ परिणाम देऊ लागतात. विशेषत: यामुळे बुध ग्रह बलवान होतो आणि त्यामुळे करिअरमधील अडथळे दूर होतात.